Ladka Bhau Yojana Maharashtra Apply Online
Ladka Bhau Yojana : सरकारकडून महिलांसाठी नुकतीच लाडकी बहिणी योजना सुरू करण्यात आली आहे. त्याच पाठोपाठ आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. या योजनेच्या माध्यमातून बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दरमहा ₹60०० रुपये देण्यात येणार आहे. पंढरपूर मध्ये आषाढी एकादशी निमित्त ही मोठी घोषणा केली आहे.(Ladka Bhau Yojana Maharashtra Apply Online)
जेव्हापासून लाडकी बहिणी योजनेला सुरुवात झालेली आहे. तेव्हापासून राज्यातील लाडक्या भावाचा काय असा प्रश्न विरोधक नेहमीच विचारत होते. यापासून वरती एकनाथ शिंदे आणि लाडक्या भावासाठी आता पंढरपूर मधून मोठी घोषणा केली आहे. मात्र या योजनेचा लाभ कोणाला होणार आहे. असा मोठा प्रश्न प्रत्येक नागरिकाला पडला आहे. या लेखाच्या माध्यमातून आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया.Ladka Bhau Yojana Maharashtra Apply Online
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, बारावी पास असणाऱ्या विद्यार्थ्यांना ६ हजार रुपये, डिप्लोमा झालेल्या विद्यार्थ्यांना 8000 तर पदवी केलेल्या तरुणांना १० हजार रुपये अशाप्रकारे दर महिन्याला देण्यात येणार आहे.
या योजनेच्या माध्यमातून अप्रेंटशिप करण्याकरता विद्यार्थ्यांना पैसे मिळणार आहे. यानंतर त्याला कामाचा अनुभव मिळेल व या अनुभवाच्या जोरावरती त्याला कुठेही नोकरी मिळेल. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले कुशल कामगार तयार करण्याकरता आमच्या सरकारचा भर आहे. आमच्या या निर्णयामुळे उद्योग क्षेत्रात कुशल तरुणांची संख्येमध्ये मोठी वाढ होईल. अप्रेंटशीप करण्यासाठी या विद्यार्थ्यांना हा स्टायफंड वाटप करण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ विद्यार्थ्यांना नक्कीच होईल.
लाडकी बहीण योजनेच्या पाठोपाठ सरकारने लाडका भाऊ देखील तेवढाच महत्त्वाचा आहे असे यावेळी त्यांनी म्हटले आहे.
इतिहासामध्ये पहिल्यांदाच कोणत्या सरकारने अशा प्रकारची योजना तयार केलेली आहे. कारण तरुण हा कारखान्यामध्ये काम करत असताना सरकार आता त्यांना अप्रेंटशिप करिता स्टायफंड प्रदान करणार आहे. या योजनेच्या माध्यमातून बेरोजगारी कमी करण्यासाठी मोठी मदत होईल.
लाडका भाऊ योजनेसाठी पात्रता काय असणार आहे? (Ladka Bhau Yojana)
- या योजनेचा लाभ मिळवण्याकरता अर्जदार हा मूळचा महाराष्ट्रातील रहिवासी असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराचे वय हे 18 ते 35 वर्षाच्या दरम्यान असावे.
- याकरता शैक्षणिक पात्रता ही बारावी पास किंवा डिप्लोमा, पदवीधर असायला हवी.
- या योजने करता राज्यातील बेरोजगार तरुण पात्र असतील.
- कर्जदाराचे बँक खाते हे आधार कार्ड सोबत लिंक असावे.