New Ration Card Rules From July 15th : महाराष्ट्र सरकार सामान्य नागरिकांना लाभ मिळावा यासाठी नवनवीन गोष्टींची तरतूद करत आहे. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की नुकतेच रेशन कार्ड व्यवस्थित काही महत्त्वपूर्ण बदल सुद्धा करण्यात आलेले आहेत. यामुळे सर्व नागरिकांनी झालेल्या बदलांची दक्षता घ्यावी व हे नवीन नियम काय आहे याचा सामान्य नागरिकांवर काय परिणाम होणार आहे याची सविस्तर माहिती या लेखाच्या माध्यमातून आपण समजून घेऊया.
New Ration Card Rules From July 15th
सर्व नागरिकांना ई केवायसी करणे अनिवार्य
महाराष्ट्र सरकारने सर्वात मोठा नियम नुकताच जाहीर केला आहे यामुळे सर्व नागरिकांना आता ई केवायसी करणे अनिवार्य करण्यात आलेले आहे. कारण यामुळे सर्व रेशन कार्ड धारकांची वैधता सुनिश्चित होणार आहे. आणि त्याचबरोबर बनावट लाभार्थ्यांना आळा घालण्यासाठी मोठी मदत होईल. त्यामुळे आतापर्यंत ज्या नागरिकांनी आपली ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही अशा सर्व नागरिकांनी आपली ई केवायसी लवकरात लवकर पूर्ण करणे अत्यंत गरजेचे आहे. अन्यथा त्यांचे रेशन कार्ड निष्क्रिय होण्याची शक्यता आहे.
रेशन कार्डधारकांसाठी आधार पडताळणी आवश्यक
रेशन कार्डधारकांना आपल्या आधार कार्ड सोबत पडताळणी करणे आता आवश्यक असणार आहे. यामध्ये जर जुने किंवा नवीन शिधापत्रिकाधारक असेल, अशा सर्व नागरिकांनी आपली आधार पडताळणी लवकरात लवकर करून घ्यावी. याकरता सर्व नागरिकांनी रेशन दुकानदाराकडे जाऊन ऑफलाइन पद्धतीने अर्ज प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी. या नावीन्यपूर्ण योजनेमुळे केवळ जे खरे लाभार्थी आहेत त्यांनाच लाभ मिळेल.New Ration Card Rules From July 15th
घरबसल्या १० मिनिटात भरता येईल लाडकी बहीण योजनेचा अर्ज, पुर्ण माहिती वाचा
आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांची माहिती अपडेट करा
रेशन कार्डधारकांनी आपल्या कुटुंबांमधील सर्व सदस्यांची माहिती नियमितपणे अपडेट करून घेणे अत्यंत गरजेचे असणार आहे. कुटुंबामधील कोणत्याही सदस्याचे स्थलांतर पाचवा मृत्यू झाल्यास ही माहिती तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना कळविणे गरजेचे आहे. अशी घटना घडल्यास संबंधित व्यक्तीचे नाव राशन कार्ड मधून कमी करण्यात येते. ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास संपूर्ण कुटुंबाचे रेशन कार्ड जप्त होण्याची सुद्धा शक्यता असते.
राशन कार्ड घेण्यासाठी अपात्र सदस्यांची नावे कमी करा
महाराष्ट्र सरकार द्वारे जाहीर करण्यात आलेल्या नवीन नियमाच्या अनुसार ज्या व्यक्तींना शिधापत्रिकेची गरज नाही. अशा सर्व व्यक्तींची नावे शिधापत्रिकेमधून कमी करून घ्यावी. यामुळे खरोखर गरजू असलेल्या शिधापत्रिकाधारकांना मोफत रेशन चा लाभ पोहोचू शकेल.
रेशन धारकांच्या अंगठ्याची पडताळणी
काही राज्यांमध्ये सद्यस्थितीत आता रेशन वितरण करण्याचे वेळी प्रत्येक लाभार्थ्याला आपल्या अंगठ्याची पडताळणी करणे आवश्यक आहे. या प्रक्रियेमुळे योग्य व्यक्तीची निवड करून गरजू लाभार्थ्यापर्यंत मोफत रेशन वाटप होईल. व गैरप्रकारे रेशन मिळवणाऱ्या रेशन धारकांना आळा बसेल. New Ration Card Rules From July 15th
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये या महिलांना मिळणार नाही
त्याचप्रमाणे काही काही राज्यातील सरकारांनी ज्या व्यक्तींचे उच्च उत्पादन आहे अशा कुटुंब धारकांना रेशनच्या प्रमाणात कपात करण्यात आलेली आहे. यामागील मुख्य उद्देश म्हणजे अनुदानित रेषांचा लाभ प्रामुख्याने कमी उत्पन्न असलेल्या आणि गरजू कुटुंबापर्यंत नियमितपणे पोहोचू शकेल.
नवीन शिधापत्रिकाधारकांसाठी अर्ज प्रक्रिया उपलब्ध
गरजू नागरिकांना नवीन शिधापत्रिका मिळवण्याकरता आता ऑनलाईन तसेच ऑफलाइन पद्धतीने सुद्धा अर्ज करता येऊ शकणार आहे. यासोबतच अर्ज करत असताना काही आवश्यक कागदपत्रांची सुद्धा गरज भासणार आहे. याविषयीची कागदपत्रे कुठली आहे याची संपूर्ण माहिती सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
यामुळे वरील दिलेल्या नियमांचे पालन करून योग्य ते शिधापत्रिकाधारक आपल्या रेशन कार्डचा लाभ मिळू शकतात. तुम्ही आतापर्यंत तुमची इ केवायसी केलेले नसेल तर लवकरात लवकर करून घेणे गरजेचे असणार आहे.
New Ration Card Rules From July 15th
अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
आपल्या मित्रांना पोस्ट शेयर करा
New Ration Card Rules From July 15th